जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी प्रमुख असलेल्या भारत देशात प्रत्येक देशबांधवाला आपल्या देशाच्या राज्यघटनेचा आदर असायला हवा. घटनेने दिलेले ‘हक्क आणि कर्तव्ये’ नागरीकांनी राष्ट्रीय कर्तव्य समजून अंगीकारली पाहिजेत.
‘15 ऑगस्ट’, ‘26 जानेवारी’ या राष्ट्रीय सणांच्या दिवसांकडे फक्त सुट्टी म्हणून पाहायचे का ?
क्रांतीकारकांच्या, स्वातंत्र्यसेनानींच्या त्यागाला, बलीदानाला आपण काय श्रध्दांजली वाहणार आहोत ?
ध्वजवंदनाने करु राष्ट्रीय सणांची सुरुवात...
क्रांतीकारकांच्या बलिदानाची तेवत ठेवू वात...
राष्ट्रभक्तीने करु देशाच्या संकटावर मात...
'प्रजासत्ताक भारताच्या' अंमलबजावणीसाठी तन, मन, धन देणारे देशभक्त पुढे येतील याची खात्री वाटते.
26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही तत्वांनुसार घटना अंमलात येऊन खर्या अर्थाने जनतेचे राज्य अस्तित्वात आले.
सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे