आजचे प्रजासत्ताक


भारत देशाला हजारो वर्षांचा इतिहास आहे. आजवर देशावर अनेक संकटे आली. अनेकदा नैसर्गिक आपत्ती देखील आल्या. सर्व संकटे पचवून देश आजही दिमाखात उभा आहे.

जनतेच्या हाती सत्ता येऊन जनता सार्वभौम झाली. दुदैवाने जनता मात्र स्वकेंद्रीत झाली. देशासाठी असलेले आपले कर्तव्य विसरु लागली. राजकीय पक्षांनी या संधीचा आपल्या राजकीय विस्तारासाठी फायदा घेतला.

याचबरोबर धर्मभेद, जातीभेद वापरुन इंग्रजांच्या ‘फोडा आणि राज्य करा’ या वृत्तीप्रमाणे आपला स्वार्थ साधला. सत्ता मिळविणे व मिळालेली सत्ता टिकविणे याचसाठी राजकीय पक्ष झगडू लागले.


भारतात खर्‍या अर्थाने ‘प्रजासत्ताकाची’ अंमलबजावणी झाली आहे का ?


  • ‘प्रजासत्ताक’ भारतात सर्वसामान्य व्यक्ती हीच सर्वोच्च आहे. परंतु दुर्देवाने जनतेतून निवडलेले लोकप्रतिनिधी व शासकीय कर्मचारी स्वत:ला सर्वोच्च्य समजत आहे.

  • पैसा, गुंडगिरी या द्वारे ‘मत’ विकत घेऊन निवडणूका लढविल्या जातात.

  • सरकारी मान, मानधन, गाडी, घर, आरोग्य, प्रवास, निवृत्तीवेतन तसेच इतर अनेक सुविधा मिळूनही लोकप्रतिनिधी व शासकीय कर्मचारी जनतेची कामे करीत नाही.

  • स्वातंत्र्याच्या नंतरही वीज, पाणी, रस्ता, रोजगार या मुलभूत प्रश्‍नांसाठीच निवडणूका लढविल्या जातात.

  • हरितक्रांतीच्या भारत देशात आजही शेतकरी आत्महत्या करतात.

  • शासकीय निधींचे मोठमोठे गैरव्यवहार करुन जनतेचा पैसा लुबाडला जातो.

  • शासकीय कार्यालयात महिनोंमहिने चकरा मारुनही लाच दिल्याशिवाय जनतेची कामे होत नाहीत.

  • जगाला शांतीचा संदेश देणार्‍या देशात खून, बलात्कार, दरोडे वाढतच चालले आहे.

  • जगातील मोठी लोकशाही असूनही मतदानाचे प्रमाण 50 ते 60 टक्के आहे.

  • दहशतवाद, बॉम्बस्फोट यांमुळे सामान्य नागरिक हादरला आहे.

  • भारत हा आजही विकसनशील देशात मोडला जातो. विकसीत नाही.

'प्रजासत्ताक भारताच्या' अंमलबजावणीसाठी तन, मन, धन देणारे देशभक्त पुढे येतील याची खात्री वाटते.


26 जानेवारी 1950 रोजी लोकशाही तत्वांनुसार घटना अंमलात येऊन खर्‍या अर्थाने जनतेचे राज्य अस्तित्वात आले.

देशातील मोठ्या प्रमाणातील युवापिढी खेड्यापाड्यांत राहत असून उच्च शिक्षण, दर्जेदार शिक्षण, खेळ, कला,

भारत देशाची लोकसंख्या 125 कोटी असून त्यात 50 टक्के स्त्रिया आहेत. महिलांना दुय्यम स्थान देऊन देशाची

सर्व क्षेत्रात देश जोमाने प्रगती करीत आहे. ज्या लोकप्रतिनिधींच्या मार्फत देशाचा विकास होणे अपेक्षित आहे

‘‘व्यवस्था परिर्वतन करा.. तुमच्या कल्पना वापरुन’’ व्यवस्थेला दोष देण्यापेक्षा सुदृढ लोकशाहीसाठी पुढे या.

जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशांपैकी प्रमुख असलेल्या भारत देशात प्रत्येक देशबांधवाला